उल्हासनगर, दि . १९ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेची पहिली महासभा आज होत असुन या महासभेत जनतेच्या विरोधातील मुद्दे असल्याने भाजपा व शिवसेना या मुद्द्याना मंजुरी देणार की विरोध करणार या कडे शहरवाशीयांचे लक्ष लागले असुन या मुद्द्यांवर दोन्ही पक्ष एकत्र येणार की नाही. हे महासभेतच समजणार आहे.
उल्हासनगर महापालिकेची पहिला महासभा आज होत आहे. या महासभेत पाणी दरात वृध्दी करण्याचा प्रस्ताव असुन महापालिका क्षेत्रात जे नवीन बांधकामे झाली आहेत तसेच अतिरिक्त अनधिकृत बांधकामे केली आहेत, त्या मालमत्ताना वार्षीक शुल्क व कर निर्धारण मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे हे दोन्ही प्रस्ताव जनतेच्या विरोधात आहेत. तेव्हा या प्रस्तावाना भाजपा व शिवसेना विरोध करणार का , असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आयुक्त सौ . मनिषा आव्हाळे यांनी पाणी करात वाढ सुचवली असुन आर सी सी बांधकाम धारकाना वर्षाला ३६०० रुपयावरुन ८००० रु वाढीचा प्रस्ताव आहे. तर पत्र्यांच्या घरासाठी १८०० रुपयावरुन ६५०० रुपये वाढीचा प्रस्ताव आहे.
हे दोन्ही प्रस्ताव जनहिता विरुध्द असल्याने आज होणाऱ्या महासभेत भाजपा व शिवसेना ही महायुती विरोध करणार की मंजुरी देणार हे महासभेत समजणार आहे. सत्ता स्थापन होवुन १५ दिवस उलटले असुन महापौर व उपमहापौर यांची कोणती ही कामगिरी सध्या तरी दिसुन येत नाही. त्या सोबतच स्विकृत नगरसेवकांची निवड बाकी असुन स्थायी समिती व इतर विषय समिती सदस्यांची निवड झाली नाही . मात्र जनहिता विरुध्द च्या प्रस्तावासाठी महासभा होणार आहे.




