अंबरनाथ

अंबरनाथकरांचा लवकरच पाणी प्रश्न सुटणार

अंबरनाथ , दि . ११ प्रतिनिधी : अंबरनाथकरांच्या पाणी प्रश्नाला कायमचा पूर्ण विराम देण्याकरिता अमृत टप्पा २ या पाणी योजनेचे काम सुरु केले असून पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात वन विभागाच्या जमिनीच्या काही त्रुटी भासत असल्याने ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत टाकी साठी प्रस्तापित असणाऱ्या जागेचा प्रश्न जलद गतीने मार्गी लावण्याची मागणी आमदार डॉ . बालाजी किणीकर यांनी केली आहे.
अंबरनाथ शहराला पाण्याची समस्या भेडसावत आहे. ही समस्या कायमची सोडवन्यात यावी म्हणुन अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु केले आहे .परंतु पाण्याची टाकी बांधन्यासाठी जमीनीची गरज आहे. मात्र जी जमीन आहे ती वनविभागाची आहे. तेव्हा या जमीनीचा प्रश्न मार्गी लावन्यासाठी ठाणे जिल्हा नियोजन समिती कडे आमदार डॉ . बालाजी किणीकर यांनी मागणी केली आहे . दरम्यान सदर पाण्याचा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पाणी प्रश्न सोडवावा या करिता आमदार डॉ. किणीकर यांनी अंबरनाथचे तहसीलदार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तर यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जागा परियायी वन करण्यासाठी वन विभागाला वर्ग करण्या संदर्भात ही चर्चा केली आहे. यावेळी अंबरनाथचे कार्यकारी अभियंता, मा.नगराध्यक्ष श्री.सुनिल चौधरी, नगरसेवक श्री.सुभाष साळुंके, उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *