#ElectionCampaign

अजितदादांनंतर राष्ट्रवादीचे ‘मिशन इलेक्शन’ थांबले? सुनेत्रा वहिनींकडे येणार राज्याची सूत्रे?

सत्तेच्या समीकरणात आता कोणाचे पारडे जड? विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पॉवर हाऊस’ मानले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने राष्ट्रवादी काँग्रेससमोर अस्तित्वाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पक्षाने आतापर्यंतचा सर्वात मोठा भावनिक निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुकीच्या…

तिळगुळाच्या गोडीत मतांचं गणित! मकरसंक्रांतीच्या आडून उमेदवारांचा ‘सांस्कृतिक’ प्रचार

दिपक कैतके,विशेष प्रतिनिधी | मुंबई:निवडणुकीच्या आदल्या दिवशी आलेली मकरसंक्रांत उमेदवारांसाठी जणू सुवर्णसंधीच ठरली आहे. सणाचा उत्साह आणि मतदानाचा ताण यांच्या मधल्या अवकाशात उमेदवारांनी प्रचाराची एक नवी, अधिक शिताफीनं आखलेली वाट शोधली असून, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मकरसंक्रांतीच्या वाणाचा प्रभावी वापर…

७७ रणनाद, एकच संदेश! महापालिकांची लढाई ‘प्रतिष्ठेची’—मुख्यमंत्री फडणवीसांचा राज्यभर सत्तेचा शक्तिप्रयोग

विशेष प्रतिनिधी | मुंबई:महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा स्वतः खांद्यावर घेत सत्ताधारी पक्षाची ताकद, आक्रमकता आणि संघटन कौशल्य स्पष्टपणे उघड केले आहे. अवघ्या काही दिवसांत तब्बल ७७ कार्यक्रमांमधून त्यांनी राज्यभर राजकीय रणनाद घुमवला—आणि ही लढाई…

प्रचार संपताच पुण्यात ‘राजकीय भूकंप’? अजित पवारांच्या प्रचारयंत्रणेच्या कणाावर पोलीस कारवाई, चर्चांचा धुरळा

विशेष प्रतिनिधी | पुणे:महापालिका निवडणूक प्रचाराचा शेवटचा पडदा खाली येत असतानाच पुण्यातील राजकीय वातावरण अचानक तापले आहे. निवडणुकीच्या निर्णायक क्षणी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीच्या कार्यालयावर पुणे क्राइम ब्रांचने…

मुंबईत ठाकरे बंधूंची ताकद वाढली; मराठा मोर्चाचा जाहीर पाठिंबा, महापालिका रणधुमाळीत निर्णायक वळण

विशेष प्रतिनिधी | मुंबई:महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण कमालीचं तापलं असतानाच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभेनंतर सत्तासमीकरणांना नवी दिशा मिळाल्याचं चित्र स्पष्ट होत…

ग्रामसत्तेचा फैसला जवळ! १२ जिल्हा परिषद-१२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर; आचारसंहिता लागू, राजकीय पक्ष अलर्ट

मुंबई | प्रतिनिधी:राज्यातील ग्रामीण सत्तेचा कौल ठरवणाऱ्या १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे रणशिंग आज फुंकले गेले. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे…

५ वाजेची घंटा, शेवटचा श्वास! महापालिकांच्या रणांगणात आज अखेरचा राजकीय स्फोट; कुणाची कुठे ताकद?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:घड्याळाचे काटे वेगाने पुढे सरकत आहेत—आणि त्याच वेगाने महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या रणांगणातला अंतिम क्षण जवळ आला आहे. गेले १० ते १२ दिवस शहरागणिक रस्ते, चौक, गल्लीबोळ, सभामंच—सगळीकडे राजकीय तापमान उंचावलेलं. उमेदवार असोत वा पक्षांचे दिग्गज, कार्यकर्ते असोत…

निवडणूक तोंडावर, तरीही नाशिक काँग्रेस ‘नेतृत्त्वाविना’; दिग्गजांची अनुपस्थिती, कार्यकर्त्यांत अस्वस्थता

विरोधकांचा प्रचार रणसंग्राम, काँग्रेसवर मात्र शांततेचे सावट विशेष प्रतिनिधी | नाशिक:निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, काँग्रेसमध्ये मात्र अस्वस्थ शांतता आणि संभ्रमाचे वातावरण असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांनी प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात…

पैशाने मतदार विकत घेऊ पाहणाऱ्यांना निवडून देऊ नका…!

अशा ‘ अविरोध’ पेक्षा या पदांचा लिलावच करा: ज्येष्ठ संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांचा संताप… अकोला: पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दृष्ट चक्र सध्या सर्वत्र बघायला मिळते. सत्ता मिळविण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. लोकशाहीचे असे सार्वत्रिक वस्त्रहरण…

एक फडणवीस विरुद्ध दोन ठाकरेंमध्ये रंगणार मुलाखतींचा सामना

महापालिकांच्या निवडणुकांना आता कुठे रंग चढू लागला आहे. विशेषता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत आठ आणि नऊ रोजी सामना…