टॉप स्टोरी महाराष्ट्र

सौहार्दपूर्ण महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

राज्यातील 29 महापालिकांसाठी आज सकाळी 7.30 वाजतापासून मतदान होत असून 2869 नगरसेवक रिंगणात आहेत. हे मतदान सौहार्द पूर्ण, शांततामय आणि भयविरहित वातावरणात होण्यासाठी राज्याचे प्रशासन जय्यत तयारीत आहेत.

मतदान सुनियोजित पद्धतीने व्हावे यासाठी मतदारांपर्यंत मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण पूर्णपणे करण्यात आलेले आहे. मतदाराचे नाव, पत्ता, मतदार यादीतील प्रभाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव व खोली क्रमांक अशी आवश्यक माहिती असलेली मतदार चिट्ठी प्रत्येक मतदारापर्यंत पोचविण्याची व्यवस्था घनकचरा व्यवस्थापन विभागाने चोख बजावली आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. महिलांचे मतदान सोईस्कर व्हावे म्हणून प्रशासनाने विशेष तजबीज करत प्रत्येक प्रभागात एक गुलाबी सखी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.

या मतदान केंद्राचे वैशिष्ट म्हणजे येथे सर्व व्यवस्थापन महिलांकडून होणार आहे. महिला मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह वातावरण मिळावे हा यामागील हेतू आहे.
याशिवाय प्रत्येक झोनमध्ये एक आदर्श बुध तयार करण्यात आला असून तेथे मतदारांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर व सर्व समावेशक उपायोजना करण्यात आलेल्या आहेत.निवडणुकीत आचारसंहिता प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागात विभागीय सहाय्यक आयुक्तांच्या अधिपत्याखाली विशेष पथके कार्यरत आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन सर्वेक्षण, आणि नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
मुंबईमध्ये २१७ जागांसाठी सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणात आहेत. तर नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून पोलींग पार्ट्या
मतदान केंद्रावर रवाना झालेल्या आहेत. नागपूर शहरात 38 प्रभागांमध्ये 151 उमेदवार रिंगणात आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *