भाजपमध्ये प्रवेश करताच संतोष धुरींचा आरोपांचा भडिमार; ‘त्या’ दाव्यावर अखेर संदीप देशपांडेंनी फोडला मौनाचा बांध
विशेष प्रतिनिधी :महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप–प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. मनसेला जय महाराष्ट्र करत माजी नगरसेवक यांनी थेट चा झेंडा हाती घेतला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या दाव्यांची मालिकाच सुरू केली.
धुरी यांनी मनसेतील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करताना थेट पक्षातील वरिष्ठ नेते यांच्यावर गंभीर आरोप केले. एवढंच नाही तर मनसेप्रमुख यांचे कट्टर समर्थक आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे संदीप देशपांडे यांच्याविषयीही धक्कादायक दावा केला.
धुरी यांचा आरोप असा की, “वांद्रेतील बंगल्यावरून स्पष्ट संदेश देण्यात आला होता — संतोष धुरी आणि संदीप देशपांडे कुठेही एकत्र दिसू नयेत. संदीप देशपांडेंना कोणत्याही चर्चेत सहभागी करून घ्यायचं नाही.” या वक्तव्याने राजकीय चर्चांना अधिकच उधाण आलं.
नेमकं काय म्हणाले होते संतोष धुरी?
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर धुरी यांनी दावा केला की, मनसेमध्येच काही नेते संदीप देशपांडे नाराज असल्याच्या अफवा पसरवत आहेत. “संदीप देशपांडेंनीही पक्ष सोडावा, अशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली जातेय,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
अखेर संदीप देशपांडेंनी दिली थेट प्रतिक्रिया
या आरोप–चर्चांवर बोलताना संदीप देशपांडे यांनी ठाम शब्दांत स्पष्ट केलं “गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या नाराजीच्या बातम्या फिरत आहेत. या सर्व अफवांना पूर्णविराम देणं गरजेचं होतं. मी मनसेतच आहे आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करतोय.”
इतकंच नव्हे तर, आगामी महानगरपालिका निवडणुकांकडे लक्ष वेधत ते म्हणाले, “मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करतोय.”
संतोष धुरी यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना देशपांडे यांनी विषयाला शांतपणे हात घातला—
“संतोष धुरी काय बोलतोय यावर मला रिअॅक्ट होण्याची गरज नाही. त्याचा एक दृष्टीकोन असेल, माझा वेगळा आहे. तो त्याच्या दृष्टीने बोलतो, मी माझ्या दृष्टीने.”
राजकीय नाट्याचा पुढील अंक…
धुरींच्या आरोपांनंतर आणि देशपांडेंच्या स्पष्टीकरणानंतर, मनसेतील अंतर्गत राजकारणावर पडदा टाकला जातोय की नव्या चर्चांना सुरुवात होतेय—हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, महाराष्ट्राच्या राजकारणातील हे नाट्य लवकर थांबणार नाही!
—
Deepak Kaitke




