उल्हासनगर , दि . ८ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आले असता त्यांनी शहरात गुंडागर्दी खपवुन घेणार नसल्याचे इशारा देत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपल्या यंत्रणेचे काम सुरु आहे . शहर विकासासाठी कोणता ही निधी कमी पडु देणार नाही . असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकी मध्ये भाजपाने ७८ उमेदवार उभे केले आहे . त्यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडक्या बहीणींवर भाष्य करत आता लाडक्या बहीणी ह्या लखपती दिदी होणार असल्याचे गाजर दाखवत एक प्रकारे लाडक्या बहिणीना अमिष दाखवले आहे. पुढे ते म्हणाले की ठाणे भिवंडी मेट्रोचा फायदा उल्हासनगर ला होणार असुन इमारतीच्या नियमितीकरणाची प्रक्रिया ही नव्याने सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान उल्हासनगर शहराला पाण्याचा नव्याने स्त्रोत निर्माण करण्याचा संकल्प फडणवीस यांनी केला आहे .शहरातील सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.तर भाजपा ५० चा आकडा पार करणार असल्याचा सुतोवाच त्यांनी केला आहे. शहराचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे सागुन भाजपाच्या उमेदवारा निवडुण देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले आहे. यावेळी सभेला आमदार कुमार आयलानी , आ . चित्रा वाघ , जिल्हा अध्यक्ष राजेश वधारिया , महेश अग्रवाल , उध्दव रुपचंदानी , प्रदीप रामचंदानी यांच्यासह ७८ उमेदवार उपस्थित होते.



