टॉप स्टोरी महाराष्ट्र राजकारण

ठाकरे बंधूंना मराठा मोर्चाचा पाठिंबा

मुंबई:मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हळूहळू रंग भरत असताना मनोज जरांगे पाटील यांचा मराठा मोर्चाही या निवडणुकीत उतरला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबई समन्वयक सावंत यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे पाटील यांच्या मते मुंबई ठाकरे बंधूंच्या हातातच शोभून दिसते आणि ठाकरे बंधूंना पाठिंबा देण्यासाठी एक वेगळी शिवनीती आखल्याचे मराठा मोर्चाचे समन्वयक सावंत यांनी सांगितले.

मुंबई महाराष्ट्राची राखण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांमध्ये जवळपास 80 टक्के मराठा म्हणजेच मराठी बांधव होते. त्या लढ्याच्या वेळी ठाकरे घराण्याचे मोठे योगदान राहिलेले आहे, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *