टॉप स्टोरी

Top Story -९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साताऱ्यात सुरुवात

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साताऱ्यात सुरुवात
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून साताऱ्यात सुरु होत आहे.आज सकाळी ध्वजारोहण, ग्रंथप्रदर्शनांच्या उदघाटन, प्रकाशन कट्टा, कवी कट्टा, गझल कट्टा, या कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. २ जानेवारीला साहित्य संमेलनाचे औपचारिक उदघाटन हॊणार आहे. ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. संमेलनाला राजकीय व साहित्य क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित राहणार आहेत.

अहिल्यानगरमध्ये मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण
३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अहिल्यानगरमध्ये सर्वच उमेदवार प्रचाराच्या नियोजनात व्यस्त असताना मात्र प्रभाग १७ मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग यांचा गेल्या २४ तासांपासून त्यान्च्या कुटुंबाशी संपर्क झाला नाही. त्यांचे मोबाइलला फोनही बंद येत आहेत. या दोन्ही उमेदवारांचे राजकीय दबावातून किंवा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अपहरण करण्यात आले असावे असा खळबळजनक आरोप मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

भाजपाची स्थिती इतिहासातील काँग्रेससारखी, सुषमा अंधारे
भाजपमध्ये नाशिकच्या देवयानी फरांदे असो किंवा सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी असो, हे सर्व भाजपमध्ये आलबेल नसल्याची स्थिती आहे. ज्या निष्ठावंतांनी भाजपचे घर बांधले त्यांनाच आज बाहेरून आलेल्या उपऱ्यांसाठी घराबाहेर काढले जात आहे.असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. सुषमा अंधारे यांनी भाजपची स्थितीची तुलना इतिहासातील काँग्रेसशी केली.

९९ व्या मराठी साहित्य संमेलनात प्रथमच १० माजी अध्यक्ष
सातारा शहरात वर्षाच्या सुरुवातीलाच ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य कि मागील अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांच्यासह १० माजी अध्यक्षही उपस्थित राहणार आहे. हे सर्व ४ दिवस साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे सातारकर यांना, त्यांना भेटण्याची संधी मिळणार आहे.

चंद्रपूर किडनी प्रकरणाला नवे वळण, प्रेयसीसाठी हिमांशूने स्वतःची किडनी विकली
चंद्रपूर किडनी प्रकरणात कंबोडिया रॅकेटचे धागेदोरे गवसले आहे. आता या साखळीत एक महत्वाचा दुवा पंजाबच्या मोहाली येथील हिमांशू भारद्वाज असल्याचे समोर आले आहे. सिंगापूर येथे हॉटेल मॅनॅजमेण्टचा कोर्स पूर्ण केल्यानंतर भारतात परतल्यावर मोहालीतील परिचारिका असलेल्या एका युवतीवर त्याचे प्रेम जडले तिच्यावर त्याने लाखो रुपयांची उधळण केली. अशातच या युवतीने दुसर्याशी विवाह केला. तोपर्यंत प्रेयसीवर केलेल्या खर्चातून तो लाखो रुपयांनी कर्जबाजारी झाला. या कर्जातून मुक्त होण्यासाठी हिमांशूने कंबोडियात जाऊन किडनी विकली. आणि त्यानंतर तोही या रॅकेटमध्ये शामिल झाला.

मुंबई अहमदाबाद प्रवास अवघ्या २ तासात
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा मुहूर्त जाहीर करून या प्रकल्पाची मोठी घोषणा केली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ २ तास ७ मिनिटांवर येणार आहे. प्रवाशांसाठी दर २ तासांनी हि ट्रेन उपलब्ध राहील.

अशोक चव्हाणांनी उमेदवारीसाठी ५० लाख घेतल्याचा आरोप
नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात महापालिकेची निवडणूक लढविली जात आहे. अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार जाहीर करण्यात आलेत. यात अनेक इच्छुकांचे तिकीट कापण्यात आले. यात अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक भानुसिंह रावत त्यांचा देखील समावेश आहे. मुलाचे तिकीट कापल्याने नाराज भानुसिंह यांनी अशोक चव्हाण यांनी प्रत्येक उमेदवाराकडून ५० लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *