अकोट अकोला जिल्हा

अखेर डॉ. श्याम देशमुख व मित्रपरिवार यांच्या नरनाळा महोत्सव पोपटखेड येथेच साजरा करावा प्रत्यक्ष मागणीला यश

– डॉ.श्याम देशमुख (अध्यक्ष:वंदे मातरम फाऊंडेशन, पोपटखेड) यांच्या मागणीमुळे आदिवासी बांधव आनंदात

प्रतिनिधी:अकोटसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पर्वत रांगामध्ये “नरनाळा महोत्सव” आयोजित केला आहे हा महोत्सव अकोट तालुक्याचे भुषण वाढवणारेच आहे ,परंतु महोत्सवाचे महत्व आणि ऊद्देश हा खरा सफल करावयाचा असेल तर तो संपूर्ण महोत्सव हा शहानुर,पोपटखेड या भागात जर साजरा केला तर त्या भागातील आदिवासी लोकांना रोजगार ऊपलब्ध होईल व आदिवासी लोक संस्कृती जोपासना,वनसंवर्धन,गड किल्ले दर्शन,डोंगराळ दुर्गम भागातील आदिवासींचे वास्तव स्वरूप जनजिवन जवळून बघता अनुभवता येते.

महोत्सव खरा सार्थक तेव्हाच होईल जर आपण येणाऱ्या पर्यटकांना किल्ले दर्शन व जंगल भ्रमंती व ग्रामीण लोकांना रोजगार ऊपलब्ध करुन देणे हा ऊद्देश डोळ्यासमोर ठेवून महोत्सवाचे आयोजन हे त्याच परिसरात करावे कारण अकोट पासुन शहानुर हे अंतर 22 कि. मी. आहे त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करावा या आयोजनाचे स्थळ हे शहानुर, पोपटखेड परीसरातच करण्याचे निर्देश मा. जिल्हाधिकारी साहेब यांचेशी चर्चा करुन आवश्यक त्या ठिकाणीच कार्यक्रम होईल अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले होते मा.जिल्हाधिकारी साहेब यांना केलेल्या मागणीला यश मिळाले आहे त्यामुळे अकोट तालुक्यातील जनसामान्य व्यक्ती व आदिवासी बहुजन वर्ग आनंदीत झालेला आहे ही मागणी मंजूर झाल्यामुळे डॉक्टर श्याम देशमुख यांचे कौतुक करण्यात आले आहे.

श्याम देशमुख व मित्रपरिवाराने नरनाळा महोत्सवाचे पोपटखेड येथे लगेच कार्यक्रमाचे काम सुरू केल्याबद्दल नरनाळा वनविभागाचे श्री. तोलिया (IFS) , महसुल विभागातर्फे तहसिलदार श्री सुनिल चव्हाण यांचे सुध्दा आभार मानले

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *